मुंबई : कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकारांच्या वाईट सवयींवर निशाणा साधला आहे. “जर अंमली पदार्थांची चौकशी खरच सुरु झाली तर अर्ध्या बॉलिवूडला तुरुंगात जावं लागेल” अशा आशयाचं ट्विट त्याने केलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. परंतु त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे मेसेज चॅट्स समोर आले आहेत. त्यानुसार, रिया एका ड्रग्स डीलरच्या संपर्कात होती, असं दिसून येत आहे.
या प्रकरणावर अभिनेता कमाल आर. खानने प्रतिक्रिया दिली आहे. “जर अंमली पदार्थांची चौकशी खरच सुरु झाली तर अर्ध्या बॉलिवूडला तुरुंगात जावं लागेल” असा दावा त्याने केला आहे. त्यामुळे एका प्रकारे त्याने बॉलिवूडमधले बहुतांश कलाकार ड्रग्ज घेतात असाचं सूचोवात केला आहे. यावेळी त्याने सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकारांच्या वाईट सवयींवर निशाणा साधला आहे.