अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजे मिनी इंडिया;पंतप्रधान मोदींकडून कौतुक

amu-is-mini-india-made-country-proud-aligarh-muslim-university-centenary-celebration-pm-narednra-modi
amu-is-mini-india-made-country-proud-aligarh-muslim-university-centenary-celebration-pm-narednra-modi

अलिगढ (उत्तरप्रदेश) l अलिगढ मुस्लिम विद्यापीठांच्या Aligarh-muslim-university भिंतीवर देशाचा इतिहास आहे. येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात भारताचं नावं प्रकाशमान केलं. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजे एक मिनी इंडिया असं पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra modi म्हणाले. मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं तोंडभरून कौतुक केलं.

पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी जगात भारताचं नाव प्रकाशमान करत आहेत. विद्यापीठात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक वेळा परदेशात भेटी झाल्या. तेव्हा बोलताना ते नेहमी हास्य विनोद आणि शेरो शायरीमध्ये रममाण होतात. ते अभिमानानं सांगतात की, आम्ही अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकलो आहोत. हे विद्यापीठ भारताचा अमूल्य ठेवा आहे. या इमारतीशी शैक्षणिक इतिहास जोडला गेलेला आहे,” असं मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले,”काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आपल्याला पत्र लिहिलं होतं. कोरोना लसींच्या संशोधनासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजे एक मिनी इंडिया आहे. इथे उर्दू, हिंदी, अरबी, संस्कृत शिकवली जाते.

ग्रंथालयात कुराण आहे. त्याचबरोबर अनुवादीत केलेलं गीता रामायणही आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात एक भारत, श्रेष्ठ भारताची चांगली प्रतिमा आहे. इथे इस्लामविषयी जे संशोधन केलं जातं, त्यामुळे भारताचे इस्लामिक देशांशी संबंध अधिक दृढ झाले आहेत,” असं मोदी म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्यात योगदान दिलं

समाजात वैचारिक मतभेद असतात. पण जेव्हा उद्देश राष्ट्रासमोर लक्ष्य प्राप्तीचा असतो, तेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून द्यायला हवेत. देशात कुणी कोणत्याही जाती वा धर्मातील असो, प्रत्येकानं देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान द्यायला हवं.

या विद्यापीठात शिकलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी विचारांना बाजूला ठेवून देशाच्या स्वातंत्र्यात योगदान दिलं. राजकारण समाजाचा भाग आहे. पण राजकारण व सत्ता यापेक्षा देशातील समाज वेगळा असतो,” असं मोदी म्हणाले.

हेही वाचा : मुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा; सुरैश रैना, सुझान खानसहित ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here