अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका;तपास CBI कडे देण्यास नकार

arnab-goswami-republic-tv-editor-plea-supreme-court-refused-to-hear-plea
arnab-goswami-republic-tv-editor-plea-supreme-court-refused-to-hear-plea

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे Republic tv मुख्य संपादक अर्णब गोस्वामी Arnab goswami यांनी रिपब्लिक विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे. तपास सीबीआयकडे CBI हस्तांतरित करण्याची याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात असून, याविरोधात रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घोेतली होती.

अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली.

त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जाण्यास मूभा दिली आहे.

ही याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचं दिसत आहे. आपली इच्छा आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये. त्याचबरोबर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावं.

हेही वाचा l “चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत काय?”;या मंत्र्यांने विचारला सवाल

यात हेच चांगले होईल की, आपण ही याचिका मागे घ्यावी,” असं न्यायालयानं सुनावलं. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली. दाद मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात जाण्याची परवानगी देत न्यायालयानं याचिका मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर गोस्वामी यांचे वकील मिलिंद साठे यांनी याचिका मागे घेतली.

हेही वाचा l ‘’जनता उसळते व बेभान होते, तेव्हा बहुमताची सरकारेसुद्धा डचमळून कोसळतात’’

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here