औरंगाबाद : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेला देश विदेशातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. सध्या राहुल गांधींची भारत जोडा यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आहे. हिंगोली जिल्ह्यात पदयात्रा सुरु असून कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी औरंगाबादचे अपंग सेलचे युवा अध्यक्ष मुदस्सीर अंसारी (Mudassir Ansari) दिव्यांग आहेत. ते गेल्या सहा दिवसांपासून राहुल गांधी यांच्या सोबत पायी यात्रामध्ये सहभागी होऊन त्यांच्या सोबत पायी चालत आहे.
राहुल गांधी यांच्याशी भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांना अपंग सेलचे युवा अध्यक्ष मुदस्सीर अंसारी यांनी सांगितले की भारत जोडो यात्रेत आपल्या सोबत मी पुढील १४ दिवस महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेत पायी चालत आपल्या सोबत राहणार आहे. राहुल गांधी यांनी सांगितले की मुदस्सीर तुम्ही एक दिव्यांग असून सुद्धा १४ दिवस यात्रेत पायी चालणार आहात याचा मला गर्वच नाही तर अभिमान आहे, मुदस्सीर अंसारी यांचे आभार मानले. मुदस्सीर अंसारीच्या हिम्मतेला सलाम करत कौतुक केले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात आगमन झाले. २० नोव्हेंबरपर्यंत ते महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात ३८२ किलोमीटर प्रवास करणार आहेत.
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचे मार्ग…
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात ३८२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. नांदेड येथे ७ ते ११ नोव्हेंबरपर्यंत यात्रा पूर्ण झाल्यानंतर हिंगोली येथे ११ नोव्हेंबर येथे पोहोचली. १५ नोव्हेंबर पर्यंत यात्रा चालणार आहे. त्यानंतर वाशीम येथे १५ ते १६ नोव्हेंबर, अकोला १६ ते १८ नोव्हेंबर, बुलढाणा १८ ते २० नोव्हेंबर असा प्रवास राहुल गांधी करणार आहेत.