मुंबई: नव्वदच्या दशकात माधुरी दीक्षित, रविना टंडन, जुही चावला यांच्याबरोबरीने आणखीन एक प्रसिद्ध अभिनेत्री होती ती म्हणजे ‘आशिकी’ फेम अनु अगरवाल.(Aashiqui fame Anu Aggarwal) ‘आशिकी’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि रातोरात स्टार बनली. एकामोगाएक चित्रपट तिला मिळत गेले मात्र तिचा अपघात झाला आणि तिचे आयुष्यच बदलेले. बॉलिवूडपासून ती लांब निघून गेली. नुकतीच ती ‘इंडियन आयडॉल’(Indian Idol) या कार्यक्रमात दिसली.
‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमात देशातील उत्तम गायक आपल्या गाण्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमात वेगवेगळ्या थीम्स ठेवल्या जातात. सध्या या कार्यक्रमात नव्व्दच्या दशकातील सुपरहिट गाणी अशी थीम ठेवण्यात आली आहे. त्या निमित्ताने ‘आशिकी’ चित्रपटाशी निगडित कलाकार मंडळींना बोलवण्यात आले होते. चित्रपटातले मुख्य कलाकार राहुल रॉय (Rahul Roy), अनु अगरवाल (Anu Aggarwal) उपस्थित होते. मात्र तिच्याबरोबर या कार्यक्रमात भेदभाव झाला असं माध्यमांशी बोलताना तिने सांगितले.
View this post on Instagram
‘इंडिया डॉट कॉम’शी संवाद साधताना अनुप्रिया अग्रवाल म्हणाली, “मी या कार्यक्रमात उपस्थित राहिले. मी राहुल रॉयच्या शेजारी बसले होते, मात्र त्यांनी मला फ्रेमच्या बाहेर काढले. मी एक संन्यासी आहे, मला अजिबात अहंकार नाही. मी आजवर जगभरात अनेक प्रेरणादायी भाषणं दिली आहेत. मी माझी स्वतःची अनु अगरवाल नावाची संस्था चालवते. मला आत्मनिर्भर पुरस्कारदेखील मिळाला आहे. अनेक तरुण प्रतिभावान गायकांना मी भेटली आहे आणि मी या कार्यक्रमात पुरेसे बोलले आहे, पण शोमध्ये त्याबद्दल काहीच दाखवलं नाही. मी या गोष्टी सोडून दिल्या आहेत. मला याबाबतीत वाहिनीच्या संपादकांना किंवा कोणालाही दोष द्यायचा नाही.”
अनु मूळची दिल्लीची असून तिने आपल्या सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली. ‘इसी बहाने’ या मालिकेत तिने काम केले. तिच्या अपघातानंतर तिने योगा शिकला आहेआणि सध्या ती सामाजिक कार्यात सहभागी होत असते.