Arnab Goswami l अर्णब गोस्वामी यांचा कोठडीतील मुक्काम वाढला, दोन दिवस बिस्किटांवरच काढले

जामीन अर्जावर शनिवारी होणार सुनावणी

arnab-goswami-republic-tv-editor-plea-supreme-court-refused-to-hear-plea
arnab-goswami-republic-tv-editor-plea-supreme-court-refused-to-hear-plea

मुंबई l अन्वय नाईक प्रकरणी सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी Arnab Goswami यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. शनिवार ७ नोव्हेंबर या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे.अर्णब गोस्वामी यांनी बाहेरच्या जेवणाची मागणी केली होती. परंतु त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने केवळ बिस्कीटं खाऊन त्यांना कारागृहात रात्र काढावी लागली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जामीन याचिकेवरील सुनावणी न्यायालयानं शनिवारीपर्यंत पुढे स्थगित केली. वास्तूविषारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी संपादक अर्णब गोस्वामी Arnab Goswami यांना अटक केली आहे. न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.

मात्र, त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम.एस. कर्णिक यांच्या दोन सदस्यीय खंठपीठासमोर उद्या १२ वाजता याचिकेवर सुनावणी होणार आहे. वेळेअभावी न्यायालय उद्या याचिकेवर सुनावणी घेईल. उद्या दुपारी या प्रकरणावरील विशेष सुनावणी घेतली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here