मंत्री अस्लम शेख यांना क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचं होतं आमंत्रण; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

cordelia-cruise-drug-party-maha-vikas-aghadi-mumbai-guardian-minister-aslam-shaikh-was-also-invited-says-nawab-malik
cordelia-cruise-drug-party-maha-vikas-aghadi-mumbai-guardian-minister-aslam-shaikh-was-also-invited-says-nawab-malik

मुंबई: ‘कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण (Cordelia Cruise Drug Party) हा प्रचंड मोठा कट असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज केला. ‘क्रूझ पार्टीत सहभागी होण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनाही आग्रह करण्यात आला होता. ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा हा डाव होता,’ असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला.

गेल्या महिनाभरापासून ‘एनसीबी’च्या बोगस कारवायांविरोधात आघाडी उघडणाऱ्या नवाब मलिक यांनी आज या प्रकरणात आणखी काही खुलासे केले. कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग पार्टी हा खंडणीवसुलीचा खेळ होता. मोठ्या घरातील लोकांना त्यात अडकवून समीर वानखेडे यांच्या प्राइव्हेट आर्मीला वसुली करायची होती. इतकंच नव्हे, राज्य सरकारच्या आशीर्वादानंच अशा ड्रग्ज पार्ट्या सुरू असल्याचंही भासवण्याचा कट होता, असा संशय मलिक यांनी व्यक्त केला. हे सांगताना त्यांनी मोठा खुलासा केला.

कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचं आयोजन करणारा ड्रग्ज पेडलर काशिफ खान यानं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील पार्टीचं आमंत्रण दिलं होतं. शेख यांनी पार्टीत सहभागी व्हावं, यासाठी तो सतत आग्रह करत होता. राज्यातील मंत्र्यांच्या मुलांना फसवून त्या पार्टीत नेण्याचा प्रयत्न करत होता. या काशिफ खानला एनसीबीनं का पकडलं नाही? अस्लम शेख यांना तो तिथं का बोलवत होता?

मंत्र्यांच्या मुलांना तो का ट्रॅप करत होता? ड्रग्जचा खेळ राज्य सरकार चालवतंय असं तर ह्यांना दाखवायचं नव्हतं ना?,’ असा सवाल मलिक यांनी केला. ‘अस्लम शेख यांना खूप आग्रह केला जात होता, ते स्वत: याबद्दल सांगतील. पण ते या पार्टीत गेले नाहीत, ते गेले असते तर ‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ असा खेळ झाला असता, असं मलिक म्हणाले.

क्रूझ पार्टीवर एनसीबीनं केलेल्या कारवाईत ‘नमस क्रे’ हा पेपर रोल जप्त करण्यात आला होता. हा पेपर रोल फॅशन टीव्हीचा स्पॉन्सरर ब्रँड आहे. यातून ड्रग्ज घेतलं जातं असं म्हणतात. जर हा पेपर रोल एनसीबीनं जप्त केला होता, तर मग हा पेपर रोल बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला, काशिफ खानला का पकडलं गेलं नाही?,’ असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here