पुणे: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला farmers movement बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप ज्येष्ठ लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या अरुधंती रॉय Arundhati Roy यांनी केला आहे. पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे देखील उपस्थित होते.
रॉय म्हणाल्या, “सरकारनं कृषी कायदे मागे घेतले पाहिजेत यामागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून शांततेच्या मार्गानं शेतकरी आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाला बदनाम करण्याचं काम सध्या सुरु आहे. माझा दिल्ली येथील आंदोलकांना पाठिंबा आहे”
यह भी पढ़ें: WhatsApp Web: व्हाट्सऐप लाया डेस्कटॉप के लिए नया फीचर
मागील काही काळापासून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा गोष्टीना आपण बळी पडू नये, आपण सर्वानी एकत्रित राहावं.
यह भी पढ़ें: Suzuki Hayabusa: ‘धूम’ वाली नई बाइक Suzuki Hayabusa, 5 फरवरी को होगा प्रीमियर
कोरोनाच्या काळात लाखो नागरिकांच्या नोकर्या केल्या. मात्र, आपल्या देशातील काही मूठभर उद्योगपतींच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली, अशा शब्दांत त्यांनी टीकाही केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मागील सात वर्षात मोदी एकदाही मीडियाला सामोरे गेले नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा: पाकिस्तान विद्यापीठाचा फतवा; मुलींना टाईट जीन्स, हायहिल्स घालण्यास बंदी!