Farmer protest l शेतकरी संघटना मोदी सरकारविरोधात आक्रमक, ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची घोषणा

farmers -declare-bharat-bandh-on-december-8-December-modi-government-farm-bill-issue
farmers -declare-bharat-bandh-on-december-8-December-modi-government-farm-bill-issue

नवी दिल्ली l केंद्र सरकारच्या Central government कृषी कायद्यांविरोधात farm bill 2020 चर्चांमधून तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता भारत बंदची bharat bandh 8 Decmeber हाक दिली आहे. ८ डिसेंबरला एक दिवसाचा देशव्यापी संप शेतकऱ्यांनी पुकारला आहे.

शेतकऱ्यांच्या संपाचा आज नववा दिवस आहे. मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावेत त्यात सुधारणा करु नये अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पंजाब, हरयाणा या राज्यातले शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांना अडवण्यात आलं असलं तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारने चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे.

मात्र आत्तापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत.त्यानंतर आता शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. असं असलं तरीही उद्या होणाऱ्या बैठकीला शेतकरी हजर राहणार आहेत.

हेही वाचा l वाचाळ बडबड करणार्‍यांना हा निकाल म्हणजे जबरदस्त चपराक;अजित पवारांचा भाजपाला टोला

कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे. मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत हीच आमची ठाम भूमिका आहे असं ऑल इंडिया किसान सभेचे कार्यकारी सचिव हनान मोलाह यांनी म्हटलं आहे.

आम्ही कालच सरकारला आमची मुख्य मागणी सांगितली आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, रद्द करण्यात यावेत ही आमची मुख्य मागणी आहे.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here