नवी दिल्ली : देशात कोरोनाचा तांडव सुरुच आहे. दुसरी लाट घातक होत चालली आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ कोरोना रुग्ण आढळले. आता एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. तर २८१२ जणांचा मृत्यू झाला आहे.India-reports-todays-3-lakh-52-thousand-991-new-covid-19-cases-news-update
आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत असताना अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र अद्यापही देशातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.
India reports 3,52,991 new #COVID19 cases, 2812 deaths and 2,19,272 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,73,13,163
Total recoveries: 1,43,04,382
Death toll: 1,95,123
Active cases: 28,13,658Total vaccination: 14,19,11,223 pic.twitter.com/32V7eKf1UR
— ANI (@ANI) April 26, 2021
आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात सध्याच्या घडीला २८ लाख १३ हजार ६५८ अॅक्टिव्ह रुग्ण असून १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ जणांचा लसीकरण झालं आहे. १५ एप्रिलपासून भारतात दोन लांखाहून अधिक रुग्ण आढळत असून तीन लखांहून अधिक रुग्ण आणि दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होण्याचा हा सलग पाचवा दिवस आहे.
हेही वाचा : “…देशावर आज कोरोनाच्या त्सुनामीत गटांगळ्या खाण्याची वेळ आली नसती”
सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ६६ हजार १९१ रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर उत्तर प्रदेश (३५,३११), कर्नाटक (३४,८०४), केरळ (२८,४६९) आणि दिल्लीचा (२२,९३३) क्रमांक आहे.