१ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकताच पायल घोषची माघार

अनुराग कश्यपवर आरोप करताना पायलने रिचा चड्ढाचा केला होता उल्लेख

payal-ghosh-ready-to-apologise-richa-chadha-bombay-hc
payal-ghosh-ready-to-apologise-richa-chadha-bombay-hc

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या पायल घोष विरोधात अभिनेत्री रिचा चड्ढाने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. पायलने एका व्हिडीओच्या माध्यमातून अनुरागवर आरोप करताना रिचाचे देखील नाव घेतले होते. रिचाने तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा दावा ठोकला होता. परंतु या प्रकरणातून पायलने आता माघार घेतली आहे.

वाचा :”सर्जिकल स्ट्राइक करुन निवडणुका जिंकता आल्या”;’त्या’ वचनांचे काय? : शिवसेनेचा मोदींना सवाल

कोर्टात सुनावणीदरम्यान पायलने माघार घेतली. ती म्हणाली, “मी रिचाची बिनशर्त माफी मागायला तयार आहे. कुठल्याही हेतूपरस्पर तिचं नाव मी घेतलं नव्हतं. माझ्याकडून चूक झाली. मी तिची खूप मोठी फॅन आहे. मी बोलताना थोडं भान ठेवायला हवं होतं. मी माझं विधान मागे घेत आहे. कुठल्याही महिलेला बदनाम करणं हा माझा उद्देश नव्हता.”

अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच पायल आणि इतरांना खोटी वक्तव्ये करण्यापासून रोखण्याचा अंतरिम दिलासा देण्याची मागणीही केली आहे. पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटीआणि बदनामी करणारी असल्याचा आरोप रिचाने याचिकेद्वारे केला आहे. रिचाने पायलसोबत अभिनेता कमाल आर. खान यालाही प्रतिवादी केले आहे.

 वाचा : अमर,अकबर,अँथनीच रॉबर्ट शेठला पराभूत करतील;सचिन सावंतांचे दानवेंना उत्तर 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here