मुंबई l कॉमेडियन भारती सिंह Bharti Singh अटक प्रकरणावरून बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत Rakhi Sawant चांगलीच संतापली आहे. भारती व तिचा पती हर्ष यांना अटक झाली नंतर जामीन मिळाला. या सगळ्या प्रकरणावरून राखी सावंतने एक व्हिडीओव्दारे काही प्रश्न उपस्थित करुन संताप व्यक्त केला आहे.
भारती सिंह ड्रग्ज प्रकरणावर वक्तव्य करत प्रश्न विचारला आहे. बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने राखी सावंतचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘सध्या जे काही सुरु आहे, अनेकांच्या घरी अचानक छापा घातला जातो आणि तेथे ड्रग्ज मिळतात याची कोणी टीप देत आहे का? या संदर्भात कोणी फोन करुन माहिती देत आहे का? मला याबाबत काहीही माहिती नाही.
View this post on Instagram
मला फक्त इतकच हवं आहे नेहमी फक्त कलाकारच का पकडले जातात? का कोणत्या मंत्र्याचा मुलगा पकडला जात नाही? संपूर्ण देशात ड्रग्ज केवळ कलाकारच घेतात का? दुसरे का पकडले जात नाहीत?’ असे राखी म्हणाली आहे. पुढे ती म्हणते ‘मला हा फंडा समजतच नाही.
हेही वाचा l मी शांत आणि संयमी, नामर्द नाही;उध्दव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
सर्वात पहिले भारतीसोबत असे काही होऊ शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. कारण ती भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन आहे, तिचा सर्वजण आदर करतात. मी जेव्हा भारतीला अटक झाल्याची बातमी ऐकली तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. भारती आणि हर्ष माझे चांगले मित्र आहेत. कोणी तरी त्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले आणि फोन केला आहे.’मला असे वाटते हे कोणाचे तरी षडयंत्र आहे.