“याकूब कबर प्रकरणी आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकतो, पण…”, शिवसेनेचा भाजपवर पलटवार

मुंबई दंगलीचा आणि बॉम्बस्फोटांचा सर्वात मोठा घाव शिवसेनेवरच बसला. तेव्हा हे आजचे ‘कुळे-बुळे’ हिंदुत्ववादी कोणत्या बिळांत लपून बसले होते हे महाराष्ट्र जाणतो. आज याकूब याकूब म्हणून छाती पिटणारे तेव्हा कोणत्याच लढाईत नव्हते. शिवसेनाच सगळ्यांची रक्षणकर्ती म्हणून पुढे होती”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

saamana-editorial-on-yakub-memon-kabar-devendra-fadnavis-bjp-news-update-today
saamana-editorial-on-yakub-memon-kabar-devendra-fadnavis-bjp-news-update-today

मुंबई : याकूब मेमन (Yakub Memon) कबर प्रकरणी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial)  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्यात आलं आहेत. त्यांना आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकतो, असंही म्हणण्यात आलंय. तसंच (उप) मुख्यमंत्री म्हणत सामनातून फडणवीसांना छेडण्यात आलंय. “याकूब कबरीच्या प्रकरणात आम्हीही फडणवीसांना (Devendra Fadnavis) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शंभर प्रश्नांचा भडीमार करू शकतो, पण राजकारण इतक्या खालच्या स्तरावर निदान आम्ही नेऊ इच्छित नाही. मुंबई दंगलीचा आणि बॉम्बस्फोटांचा सर्वात मोठा घाव शिवसेनेवरच बसला. तेव्हा हे आजचे ‘कुळे-बुळे’ हिंदुत्ववादी कोणत्या बिळांत लपून बसले होते हे महाराष्ट्र जाणतो. आज याकूब याकूब म्हणून छाती पिटणारे तेव्हा कोणत्याच लढाईत नव्हते. शिवसेनाच सगळ्यांची रक्षणकर्ती म्हणून पुढे होती”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीची चौकशी करण्याची घोषणा (उप)मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. होऊनच जाऊ द्या! आम्ही त्या चौकशीचे स्वागतच करीत आहोत, असं म्हणत सामनातून फडणवीसांना चिमटा काढण्यात आला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटांतील फाशी दिलेला आरोपी याकूब मेमन याच्या कबरीतील परिसरात दिवे लावले. ती कबर संगमरवरी दगडाने सजवली व त्याचे खापर भाजपमधील कुळ्यांनी आणि बुळ्यांनी शिवसेनेवर फोडले. सध्या महाराष्ट्रातील सर्व जीवनावश्यक विषय जणू संपले आहेत. त्यामुळेच भाजपने याकूब मेमनची कबर खणण्याचे कार्य हाती घेतले आहे, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे.

 संसदेवरील हल्ल्यांचा सूत्रधार अफझल गुरू याला फासावर लटकवले व तिहार कारागृहाच्या आवारातच दफन केले. कश्मीरात तेव्हा तणाव निर्माण झाला. याकूब मेमनच्या बाबतीत हे सर्व सोपस्कार नागपुरातच करता आले असते. म्हणजे पुढचे कबरीचे प्रकरण घडलेच नसते, पण तेव्हा मुख्यमंत्री होते आपलेच देवेंद्रजी. त्यांनी उदार अंतःकरणाने एका दिलदारीने याकूबचा मृतदेह मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना सोपवला, असं म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थि करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here