ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची;शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस फोडून भाजपमध्ये मेगाभरती सुरु

shivsena-sanjay-raut-criticized-bjp-through-saamana-editorial-over-west-bengol- assembly-election
shivsena-sanjay-raut-criticized-bjp-through-saamana-editorial-over-west-bengol- assembly-election

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये West Bengol विधानसभा निवडणुकीच्या Assembly Election 2021 पार्श्वभूमीवर जोरदार वारं वाहत आहेत. भाजप, तृणमुल, काँग्रेस आणि डावे असे प्रमुख पक्ष आहेत.असं असलं तरी तृणमुल आणि डाव्यांमध्ये थेट लढत होतीय. सत्ताधारी तृणमुलमधून आऊटगोईंग सुरु आहे. तर भाजपमध्ये इनकमिंग.या सगळ्या घडामोडीवर आजच्या सामना अग्रलेखातून Saamana Editorial भाजपवर Bjp शरसंधान साधण्यात आलंय. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची, अशा शब्दात सामनातून भाजपवर टीका करण्यात आलीय.

 तृणमूल काँग्रेस फोडून भाजपमध्ये मेगाभरती सुरू

“तृणमूल काँग्रेस फोडून भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे. ममता कॅबिनेटमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. त्याआधी आणखी दोन प्रमुख मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेस फोडायची, खिळखिळी करायची व तृणमूलचेच आमदार फोडून त्यांना भाजपची उमेदवारी द्यायची.

2014 साली महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक तालुका, जिह्यात याच पद्धतीने फोडून भाजपने त्यांना उमेदवा-या दिल्या. त्यातले बरेच लोक निवडून आले. अशा तऱ्हेने भाजपने आपला आकडा फुगवला. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत आहे”, असं अग्रलेखात म्हटलंय.

महाराष्ट्रातील भाजपची सूज त्याच पद्धतीची आहे

“तृणमूल काँग्रेस फोडायची, खिळखिळी करायचीस्वतःचे काहीच नाही. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून आपली फौज तयार करायची व जितं मय्याचा गजर करायचा. महाराष्ट्रातील भाजपची सूज त्याच पद्धतीची आहे. बिहारलाही तेच झाले. आता प. बंगालातही तृणमूल फोडून तृणमूलवर विजय मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे”, अशी टीका सामनातून करण्यात आलीय.

बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर

“पश्चिम बंगालातील राजकारण दिवसेंदिवस रोचक आणि रोमांचक होताना दिसत आहे, पण रोमांचक वाटणारे बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर पोहोचते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. हिंदुत्वाच्या मुद्दय़ांवर ठरवून ठिणगी टाकायची, हे भाजपने ठरवलेले आहे. तसे नसते तर कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात वादार्चीं ठिणगी पडली नसती”, असंही सामनामध्ये म्हटलंय.

अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील

“शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ममता बोलायला उभ्या राहिल्या, तेव्हा ‘जय श्रीराम’चे नारे गर्दीने दिले. ममता बॅनर्जी यावर चिडल्या व हा आपला अपमान असल्याचे त्यांनी माईकवरूनच सांगितले.

ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे व निवडणुका होईपर्यंत ते अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील. ‘जय श्रीराम’च्या नाऱयांवर ममता चिडू नयेत, या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता”, असंही सामनामध्ये म्हटलंय.

“उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. त्यास काही प्रमाणात ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. कमालीचा सेक्युलरवाद व टोकाचे मुस्लिम लांगूलचालन याचा वीट बहुसंख्य हिंदूंना येतच असतो”, असा टोला सरतेशेवटी ममतांना लगावण्यात आलाय. 

प. बंगालात लोकसभा निवडणुकीआधी दुर्गापूजा व विसर्जनावरून भाजपने तद्दन खोटा प्रचार केला व ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असूनही त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. भाजपचे प्रचाराचे गुप्त मिशन असते. ममता व इतरांचे सगळे खुल्लमखुल्ला असते. लोकसभेत भाजपला 18 जागा जिंकता आल्या. ही बाब ममतादीदींसाठी चिंतेची आहे. पण शेवटी ही बंगालची वाघीण रस्त्यावर लढा देणारी आहे व ती लढत राहील,” असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांनी हिंसाचार व दहशतवाद माजविण्याची भाषा

“भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांनी हिंसाचार व दहशतवाद माजविण्याची भाषा बंगालात सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची भाषणे, निवेदने यात वापरली जाणारी भाषा लोकशाहीस शोभणारी नाही. ममता बॅनर्जी यांना रॉयटर्स इमारतीसमोर जाळू इतकेच बोलायचे आज बाकी राहिले आहे. प. बंगालात बॉम्बचे कारखाने आहेत व त्यांना ममता सरकारचा पाठिंबा आहे, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून कोलकात्यात येऊन सांगितले गेले.

बॉम्बचे कारखाने नक्की कुठे आहेत

मग जसे ईडी वगेरेंकडून राज्याराज्यांत जाऊन विरोधकांवर छापे मारले जातात तसे छापे केंद्रीय सुरक्षा पथकाने बंगालातील बॉम्बच्या कारखान्यांवर का मारले नाहीत, हा प्रश्नच आहे. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीच तडजोड करता कामा नये. बॉम्बचे कारखाने नक्की कुठे आहेत व त्यावर केंद्राने नक्की काय कारवाई केली, त्याचा जाब खासदारांनी संसदेत विचारायला हवा,” अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

“प. बंगालचे महामहिम राज्यपाल जगदीश धनकर यांची ख्याती काय वर्णावी! महाराष्ट्राच्या राजभवनात भाजपप्रेमापायी जे सुरू आहे, तेच अधिक प्रखरतेने कोलकात्याच्या राजभवनात सुरू आहे. प. बंगालात अल कायदाचे जाळे वेगाने पसरत असल्याचा आरोप राज्यपाल जगदीश धनकर यांनी जाहीरपणे केला. ममता बॅनर्जी यांचे सरकार आणि प्रशासन काय करीत आहे, अशी राजकीय चिंता त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांचे काम हे गृहखात्यात अहवाल पाठवण्याइतकेच आहे.

प. बंगालात अल कायदाचे जाळे वाढले आहे, याबाबतचा तपशील राज्यपालांनी कोणत्या माध्यमातून गोळा केला? एखादी खासगी यंत्रणा नेमून त्यांनी अल कायदाबाबत माहिती गोळा केली असेल तर त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याशी त्याबाबत चर्चा करायला हवी. तसे न करता राज्यपाल ही माहिती प्रसिद्धीमाध्यमांना देतात व लोकांत भय निर्माण करतात, हे मन साफ असल्याचे लक्षण नाही,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

भय, दहशत, तिरस्कार निर्माण

“भय, दहशत, तिरस्कार निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार घटनात्मक संस्थांचा वापर करीत असेल तर ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर हसण्याचा अधिकार आपल्याला नाही. रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजा राममोहन राय अशा महान विभूतींनी बंगालात जन्म घेतला. फाळणीचे घाव पंजाबप्रमाणे बंगालनेही सोसले आहेत. महाराष्ट्राप्रमाणे प. बंगालला स्वातंत्र्य चळवळ, क्रांती, सामाजिक सुधारणांची परंपरा आहे. लाल, बाल, पाल हे त्रिशूळ स्वातंत्र्य चळवळीत होतेच. स्वातंत्र्यलढय़ात प. बंगाल, पंजाब व महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे होते. आजही तीनही राज्ये स्वाभिमानासाठी लढत आहेत व केंद्र सरकार या तीनही राज्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे.

पंजाबच्या शेतक-यांना दिल्लीच्या सीमेवर ठेचले जात आहे. प. बंगालात धुमशान सुरू आहे. महाराष्ट्रावर ठरवून हल्ले केले जात आहेत. पण सध्या सर्वात जास्त हालचाली बंगालात घडत आहेत. तृणमूल काँग्रेस फोडून भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे. ममता कॅबिनेटमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. त्याआधी आणखी दोन प्रमुख मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here