देशभक्ती-राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला;सोनिया गांधींचा अर्णब गोस्वामींना टोला

sonia-gandhi-slams-on-arnab-goswami-says-those-distributing-certificates-on-nationalism-now-disposed
sonia-gandhi-slams-on-arnab-goswami-says-those-distributing-certificates-on-nationalism-now-disposed

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi यांनी काँग्रेस कार्य समिती CWC च्या बैठकीत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी Arnab Goswami यांच्यावर निशाणा साधलाय. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे, असं म्हणत सोनिया गांधींनी गोस्वामींना टोला लगावला.

शेतकरी संघटनांसोबत चर्चेच्या नावावर हैराण करणारी असंवेदनशीलता आणि अहंकार मोदी सरकारनं दाखवल्याचंही सोनिया गांधी यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना म्हटलंय. ‘आठवड्याभरात संसदेचं अधिवेशन सुरू होतंय.

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. परंतु, जनहितार्थ असे अनेक मुद्दे आहेत ज्यांवर चर्चा होण्याची गरज आहे. पण सरकारची यासाठी सहमती आहे का? हेदेखील पाहावं लागेल’ असं म्हणत सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना तयारीचे आदेश दिले आहेत.

‘हे अगदी स्पष्ट आहे की कृषी कायदे अत्यंत घाईघाईने बननवण्यात आले. तसंच संसदेला या कायद्यांच्या प्रभावाचं आकलन करण्याची पुरेशी संधीही मिळाली नाही. हे कायदे खाद्य सुरक्षेच्या पायाच उद्ध्वस्त करतील, त्यामुळे आम्ही हे कायदे फेटाळून लावत आहोत’ असंही सोनियांनी यावेळी म्हटलंय.

हेही वाचा…आता नारायण राणेंना सुखानं झोप लागेल;शरद पवारांचा टोला

अर्नब गोस्वामी यांच्या लीक झालेल्या व्हॉटसअप चॅटिंग प्रकरणाचा उल्लेख करताना ‘राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा कशापद्धतीनं वेशीवर टांगण्यात आला, याचं धक्कादायक उदाहण आपण पाहिलंय. जे लोक इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र वाटतात त्यांचा आता पर्दाफाश झाला आहे’ असं काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलंय.

यावेळी काँग्रेसकडून ढासळत्या अर्थव्यवस्थेवरूनही मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. मोदी सरकारनं खासगीकरणाच्या लावलेल्या धडाक्यावरही काँग्रेसकडून चिंता व्यक्त करण्यात आलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here