नवी दिल्ली:औरंगाबाद नामांतराला स्टे मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस याचिकाकर्ते मुश्ताक अहेमद यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही याचिका फेटाळली.
नामांतरचे प्रकरण मुंबई उच्चन्यायालयात सुरु आहे. त्यावर २७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. नामांतराचे प्रकरण मुंबई सुरु असल्यामुळे सरन्यायधीश चंद्रचूड यांनी याचिका फेटाळली. सध्या नामांतर प्रकरणावरून समर्थनार्थ आणि विरोधात विभागीय आयुक्तालयात अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.