महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक

surprising-and-sad-kangna ranaut-y-level-security-by-centre-says-maharashtra-hm-anil-deshmukh
surprising-and-sad-kangna ranaut-y-level-security-by-centre-says-maharashtra-hm-anil-deshmukh

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणं ही बाब धक्कादायक आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचाच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर वाद रंगलेला असताना केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. ज्यानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभारही मानले आहेत. अशा सगळ्यात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र ही बाब धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं होतं. दरम्यान मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं  आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here