परभणीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेना (उबाठा)ला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला: हर्षवर्धन सपकाळ

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही.

Congress to march from Kalamanuri to Hingoli on March 9 against anti-farmer BJP government.
Congress to march from Kalamanuri to Hingoli on March 9 against anti-farmer BJP government.

मुंबई:चंद्रपुरात  शिवसेना (उबाठा) ShivSenaUBT ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीइंडिया आघाडीमविआलोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी  शिवसेना (उबाठा) ला मतदान केलेअसे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshvardhan Sapkal यांनी म्हटले आहे.

बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले कीचंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) ने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका व संस्कृती काँग्रेसची नाही. चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)चे ८ नगरसेवक असताना त्यांनी भाजपाला मतदान केले हे राजकीय दृष्टीकोनातून चुकलेले आहेआणि त्याचे पक्ष पातळीवरून समर्थन केले जातेकाँग्रेसची लाज काढली जातेया चोराच्या उलट्या बोंबा आहेत. चंद्रपुरसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होतीकाँग्रेसचे नेते शिवसेना (उबाठा) शी सातत्याने संपर्कात होते असे असताना संजय राऊत व त्यांच्या पक्षातील लोकांनी जी वक्तव्ये केली ती चुकीची असूनआघाडी धर्माला शोभणारी नाहीत. वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहेत्यांचे २ नगरसेवक गैरहजर राहिलेत्यांना पक्षाने बडतर्फ केले तसेच शहराध्यक्षांवरही कारवाई केली पण (शिवसेना) उबाठाने मात्र कोणतीच कारवाई केली नाहीउलट त्याचे समर्थन केलेहे काँग्रेस पक्ष कदापी सहन करणार नाही.

परभणीत काँग्रेसचा महापौर करण्यासंदर्भात आमच्याकडे प्रस्ताव होता पण सत्तेसाठी वाट्टेल ते ही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला व शिवसेना (उबाठा) च्या पाठीशी उभे राहिलो. आघाडीत शिवसेना (उबाठा) काँग्रेसची मते घेते पण काँग्रेसला मत देत नाही यावर चंद्रपूर व परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहेअसेही सपकाळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here