मुंबई l राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. तर, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) देखील वाढताना दिसत आहे.
राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत. दरम्यान, मागील २४ तासात राज्यभरात १४ हजार ७३२ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८ हजार १२९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, २०० रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.Maharashtra-records-8129-new-covid19-cases-and-14732-recoveries-in-the-last-24-hours-news-update
Maharashtra records 8,129 new #COVID19 cases, 200 deaths, and 14,732 recoveries in the last 24 hours
Active cases 1,47,354
Case tally 59,17,121
Death toll 1,12,696
Total recoveries 56,54,003 pic.twitter.com/IKYqOm50cR— ANI (@ANI) June 14, 2021
राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १,४७,३५४ आहे. तर, आजपर्यंत ५६,५४,००३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, १,१२,६९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. राज्याचा मृत्यू दर १.९० टक्के आहे. तर, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९,१७,१२१ झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ नमुने (१५.४८ टक्के) कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. राज्यात सध्या ९,४९,२५१ जण गृहविलगीकरणात आहेत, तर ५ हजार ९९७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.