संजय राऊत १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून राज्यपालांवर भडकले; म्हणाले…

shivsena-mp-sanjay-raut-warning-governor-bhagatsingh-koshyari-over-cm-governor-letter-bomb-controvercy-update
shivsena-mp-sanjay-raut-warning-governor-bhagatsingh-koshyari-over-cm-governor-letter-bomb-controvercy-update

मुंबई l शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून थेट राज्यपालांनाच जाब विचारल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून देखील राज्यपालांना लक्ष्य केलं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेतला आहे.

 “राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्त न करणं हा घटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत आहात”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.

‘विचारणारे कोण आहेत? मुख्यमंत्री, सरकार!’

उच्च न्यायालयाने राज्यपालांना विचारणा केल्यानंतर शिवसेनेच्या टीकेला अधिक धार आल्याचं दिसून येत आहे. “उच्च न्यायालयाने विचारला तसाच आम्हीही प्रश्न विचारतो आहे. विचारणारे कोण आहेत? लोकनिर्वाचित सरकार, मुख्यमंत्री विचारत आहेत. राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्ती न करणं हा घटनेचा भंग आहे.

हेही वाचा : कंगना रणौतच्या बॉडीगार्डविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

घटनेनं त्यांना अधिकार दिला आहे. एक वर्ष होऊनही आपले राज्यपाल महोदय त्या फाईलकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. हे १२ सदस्य साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुम्ही आमचा अपमान करत आहात”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

फक्त २ मिनिटांचं काम!

“१२ सदस्य जर वेळेवर नियुक्त झाले असते, तर आज राज्यात जे कोरोनाचं संकट आलं आहे किंवा तौते चक्रीवादळाचं जे संकट आलं, त्यामध्ये आपले १२ आमदार काम करत राहिले असते. आजही करत आहेत. पण राज्यपाल महोदय फार काम करत आहेत. पण आपल्या १२ सदस्यांना नियुक्त करणं हे २ मिनिटांचं काम आहे. तुम्ही किती वेळापर्यंत फाईलवर बसून राहणार, हा प्रश्न जर उच्च न्यायालय विचारत आहे, तर आम्हीही तसा प्रश्न विचारू”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here