देशाचा कारभार ‘बंच ऑफ थॉट’नुसार चालतो; दिल्लीतील सरकार ‘हम दो, हमारे दो’साठी; शेतकरी प्रश्न, महागाई, बेरोजगारीवर पंतप्रधान मोदी गप्प

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली वैजापूरात शेतकरी मेळावा संपन्न.

The country is governed according to a ‘Bunch of Thoughts’; the Delhi government serves the ‘Hum Do, Hamare Do’ agenda; Prime Minister Modi remains silent on farmers' issues, inflation, and unemployment.
The country is governed according to a ‘Bunch of Thoughts’; the Delhi government serves the ‘Hum Do, Hamare Do’ agenda; Prime Minister Modi remains silent on farmers' issues, inflation, and unemployment.

मुंबई: मागील १२ वर्षापासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान (Pm Narendra Modi) झाल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव नाहीशेती करणे महाग झाले आहेशेतकरी आत्महत्या वाढल्या आहेतबेरोजगारी वाढलेली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शेतकरीमहिला अत्याचारबेरोजगारीमहागाई यावर गप्प आहेत. अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी सरेंडर झाल्याने आता आपला शेतकरी व शेती दोन्हीसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीअसे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan vasantrao sapkal यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळेमाजी मंत्री अनिल पटेलछत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकरमाजी आमदार नामदेवराव पवारएनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखेप्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासह काँग्रेस नेते व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले कीनरेंद्र मोदी सरकारला जनतेचे काहीही पडलेले नाहीते फक्त मोजक्या उद्योगपतींचे हित जपण्यातच मग्न आहेत. हम दोहमारे दो‘ या धोरणातून भाजपाचे सरकार अदानी आणि अंबानी या मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचे चित्र देशात आहे. स्मार्ट मीटर लावून जनतेला लुटले जात आहे आणि या स्मार्ट मीटरचा पैसा अदानी व भाजपाच्या खिशात जात आहे. समृद्धी महामार्गमिसिंग लिंक सह सर्व कामात पैसे खाल्लेआता तर यांनी प्रभू रामाच्या मंदिरातील पैसेही खाल्ले. सिंधी समाजाने २०० चांदीच्या विटा दिल्या त्याचा हिशोब नाहीभक्तांनी कोट्यवधी रुपयांचे दान दिले त्याचा हिशोब नाही. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमलेले १४०० कोटी रुपयेही गायब केले आहेत. देशाचा कारभार माजी सरसंघचालक गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट पुस्तकानुसार चालवला जात आहे.

देशात आज पैसा फेकतमाशा देख‘ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी केवळ सत्तेचा आणि पैशाचा खेळ खेळत आहेत. भ्रष्टाचारमहागाई आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे हीच काँग्रेसची भूमिका आहेअसे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here