नवी दिल्ली l पश्चिम बंगालसह केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज रविवार (2 मे) लागणार आहे. या निवडणुकांमध्ये कोण गुलाल उधळणार याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे अनेक प्रसिद्धी माध्यमांवर या निवडणुकांचीही धाम धूम असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने टीव्ही डिबेटशोमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.Congress is not involved in the discussion Assembly Election Result 2021 results of five states, orders of Congress President
नेत्यांचा डिबेट शोमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय
विशेष म्हणजे देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रवक्ते आणि नेत्यांनी कोणत्याही डिबेट शोमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पाच राज्यांतील निकालाबाबत होणा-या कोणत्याही चर्चेत आम्ही सहभागी होणार नाही, असं ट्विट करुन काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोना ची भिषण परिस्थिती बघता उद्या येणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या चर्चेमध्ये महाराष्ट्र काँग्रेस पक्षाकडून कोणीही सहभागी होणार नाही.
याची सर्वांनी नोंद घ्यावी.@INCMaharashtra@sachin_inc@atullondhe@drrajuwaghmare@IYCMaha@MaharashtraPMC@SevadalMH https://t.co/oRlnE6lPEG
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 1, 2021
देश अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे
देश अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात असलेली सरकारं कोसळलीत, तेव्हा देशाच्या अशा परिस्थितीला ते जबाबदार असून, आम्ही निवडणुकीतील जय आणि परा यावर चर्चा करणार नाही. @INCIndia ने निवडणुकांच्या चर्चेतून काँग्रेसच्या प्रवक्त्यांना कोणत्याही चर्चेत सहभागी न होण्यास सांगितलेय.
MPCC also withdraws all its spokeperson from tomorrow’s elections results as per PCC president @NANA_PATOLE’S instructions @abpmajhatv @TV9Marathi @RajendraHunje @news_lokshahi @News18lokmat @JaiMaharashtraN @zee24taasnews https://t.co/S4KtLZaTar
— गांधीदूत-Atul Londhe Patil (@atullondhe) May 1, 2021
मीडियाला हवे असलेल्या कोणत्याही टिप्पणीसाठी आम्ही उपलब्ध राहू. आपण जिंकू, आम्ही हरवू, पण अशा वेळी जेव्हा लोक ऑक्सिजन, बेड, औषधे, वेंटिलेटर शोधत आहेत; आमचे कर्तव्य त्यांच्या पाठीशी उभे राहण्यात आहे, ते बरे होण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी कार्य करण्यास आम्हाला आमचं कर्तव्य सांगत आहेत. आमची भारताशी एकता आहे.