Coronavirus Maharashtra Update : राज्यात दिवसभरात ३५१ रूग्णांचा मृत्यू, ५८ हजार ९२४ कोरोनाबाधित सापडले

58924-new-covid19-cases-and-351-deaths-reported-in-maharashtra-today-news-update
58924-new-covid19-cases-and-351-deaths-reported-in-maharashtra-today-news-update

मुंबई: कोरोनाचा थैमान मुंबईसह राज्यात सुरुच आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ५८ हजार ९२४ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे.58924-new-covid19-cases-and-351-deaths-reported-in-maharashtra-today-news-update

राज्य सरकारने १५ दिवसांसाठी संचारबंदीची देखील घोषणा केलेली आहे. मात्र तरी देखील रूग्ण संख्या कमी होत नसल्याने, आता राज्यात कडक लॉकडाउन लावला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज ५२ हजार ४१२ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३१,५९,२४० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण Recovery Rate ८१.०४ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४०,७५,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,९८,२६२ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,४३,९६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,०८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,७६,५२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्रात दोन दिवसांत कडक लॉकडाउनचा निर्णय

मुख्यमंत्री दोन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे याची माहिती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, राज्या शासनाने निर्बंध कडक करत १५ दिवसांसाठी संचारबंधीची घोषणा केली आहे. मात्र निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर घराबाहेर फिरत असल्याने, आता किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज (सोमवार) घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here