मुंबई: महाराष्ट्रात Maharashtra कोरोनाचा उद्रेक झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कठोर पावले टाकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी लागू करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार आदेश जारी करण्यात आले असून आज (२७ मार्च) मध्यरात्रीपासूनच हा आदेश लागू असणार आहे.Maharashtra Night Curfew
महाराष्ट्रात आज शनिवारी कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. 35 हजार 726 रुग्ण आढळले,166 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. हजारांवर नवीन रुग्णांची भर पडली असून कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनचा एका दिवसातील हा उच्चांक ठरला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन शुक्रवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली होती.
हेही वाचा: Aurangabad Lockdown l औरंगाबादमध्ये 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन
या बैठकीत स्थितीचा आढावा घेऊन रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश निर्गमित व्हावेत अशी सूचनाही त्यांनी दिली होती. त्यानुसार आज लॉकडाऊन वाढवण्यासोबतच जमावबंदीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. हा आदेश १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
नेमकं आदेशात काय म्हटलंय?
>>राज्यात सर्वत्र २७ मार्च रोजी मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू असेल. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अशी जमावबंदीची वेळ असेल. या वेळेत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसे झाल्यास प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
>>सर्व सार्वजनिक ठिकाणं ( उद्याने आणि समुद्र किनारे ) रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील. २७ मार्च रोजी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू होईल. हा आदेश मोडला गेल्यास प्रत्येकी १ हजार रुपये दंड करण्यात येईल.
>>मास्क शिवाय कुणी फिरताना आढळल्यास त्याला ५०० रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास १ हजार रुपये दंड करण्यात येईल.
>>सर्व सिनेमागृहे (सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सेस), मॉल, ऑडिटोरियम आणि रेस्टॉरंट्स रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावीत. होम डीलिव्हरी आणि टेक अवे यासाठी मात्र या वेळेत परवानगी असेल.
🚨Directions for Containment & Management of COVID-19🚨 pic.twitter.com/n7SNEUw7vN
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 27, 2021
>>कोणत्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमास मनाई राहील. अशा कार्यक्रमांसाठी नाट्यगृह व सभागृह वापरण्यासही मनाई असेल.
>>लग्न समारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा असेल तर अंत्यसंस्काराला २० जण उपस्थित राहू शकतील.
>>आरोग्य आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे बंधन राहील.
>>आधी जारी करण्यात आलेले यासंबंधीचे सर्व आदेश ३० एप्रिलपर्यंत अमलात राहतील.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काल राज्यभरातील कोविडसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यंत काही निर्बंध लावण्यात आले आहेत:
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 27, 2021








































































































































