Dussehra 2020 l महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल : उद्धव ठाकरे

उध्दव ठाकरे यांच्याकडून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

Otherwise call for Maharashtra bandh, Uddhav Thackeray angry with Governor; said...
Otherwise call for Maharashtra bandh, Uddhav Thackeray angry with Governor; said...

मुंबई l कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास मुख्ममंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. Vijayadashmi एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा दसऱ्याच्या उत्सवातून Dussehra festival  कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

लढवय्या महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत. असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.

कोरोनाच्या संकटातच निसर्गाची अवकृपा झाली पण

कोरोनाच्या संकटातच निसर्गाची अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगडगमता सामोरे जात आहोत. कोरोनाच्या विषाणूला पराजीत करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवत आहोत.

वाचा l wood-apple : कवठ खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

घराघरापर्यंत पोहचून विषाणुचाच पाठलाग करून, त्याला रोखण्याचा आपले कोरोना योद्धा प्रय़त्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यांनीच खूप संयम दाखवला आहे.

सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो

सर्वच धर्मींयानी आपले सण, उत्सव घरीच साजरे केले आहेत. विजयादशमी अर्थात दसऱ्याचा उत्सव साजरा करणार आहोत. दसरा संकटावर, वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे

दसरा उत्साहात साजरा करतानाच..

आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणुच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे गर्दी न करण्याचे – शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल.

वाचा l almond benefits : बदाम खाण्याचे १३ फायदे जाणून घ्या

अशा प्रय़त्नातूनच आपण कोरोनारुपी रावणाचा नाश करू आणि नव्या जोमाने भरभराटीकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here