मुंबई : “अगं ए भवाने, आमचं डोकं फिरलं ना, आता माझी सटकली तर, तू गेलीस, समज, भवाने” असा इशारा राखी सावंतने कंगना रनैटला दिला. राखी कंगनाच्या त्या विधानावरून चांगलीच संतापली आहे.
राखीने तिच्या इनस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला. त्यामध्ये तिने कंगनाला चांगले सुनावले. राखी म्हणाली, मराठी माणसाशी जर तू पंगा घेशील, तर तुला महाराष्ट्रात राहणे अवघड होईल, तुला महाराष्ट्रात शूटिंग करणे अवघड होईल. “मला सुशांतच्या निधनाचे दुःख आहे. तो माझाही मित्र होता. पण याचा अर्थ कंगना तू बोलेल, त्यावर देशाच्या जनतेने विश्वास ठेवावा, असं होत नाही. कंगना, तू हे विसरु नकोस की या महाराष्ट्रात सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होतात.
सुशांतसाठी तू पाऊल उचललेस ठीक आहे, पण मराठी माणसांना काही बोललीस, एक-एक मराठी माणसाशी जर तू पंगा घेशील, तर तुला महाराष्ट्रात राहणे अवघड होईल, तुला महाराष्ट्रात शूटिंग करणे अवघड होईल. सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेऊन पब्लिसिटी घेण्याचा प्रयत्न करु नकोस.
कंगनाने सलमान खानच्या आयुष्यात जाण्याचा प्रयत्न केला. सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सलमान बोलला, चल हट गंदी, चल निकल. मोठेमोठ्या स्टार्सच्या आयुष्यात तिने जायचा प्रयत्न केला, मी त्या स्टार्सचे नाव घेऊ शकत नाही” असं राखी म्हणते.