ठाणे : बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास सर्वांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाने केली. यावरून विरोधकांनी भाजपाला घेरले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून भाजपावर हल्लाबोल केला आहे. (Jitendra Awhad on BJP manifesto for Bihar Election)
बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यास करोनाची लस मोफत देऊ, असं आश्वासन त्यात देण्यात आलं आहे. त्यावरून गदारोळ उठला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘निवडणुकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी आम्ही तुम्हांला कोरोनाची लस फुकट देऊ हे सांगणं म्हणजे माणुसकिची नीचोत्तम पातळी गाठण्यासारखं आहे.
निवडणूकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी आम्ही तुम्हांला कोरोनाची लस फुकट देऊ हे सांगणं म्हणजे माणुसकिची नीचोत्तम पातळी गाठण्यासारखं आहे.
निस्वार्थपणे लोकांच्या जीवाची रक्षा करणे हि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.
त्यासाठी मतं मागणं हा माझ्या अंदाजाने आचारसंहितेचाही भंग आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 22, 2020
नि:स्वार्थपणे लोकांच्या जीवाची रक्षा करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी मतं मागणं हा माझ्या अंदाजाने आचारसंहितेचाही भंग आहे,’ असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भाजपनं काल पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. बिहार निवडणुकीमुळं सध्या देशभरातील वातावरण तापलं आहे. बिहारमधील सत्ता टिकवण्यासाठी भाजप व नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाची आघाडी प्रयत्न करत आहे.
वाचा l JioPages l जिओचं नवं ‘JioPages’ मेड इन इंडिया ब्राउझर लॉन्च
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलही जोमाने मैदानात उतरला आहे. ‘समजा, बिहारी जनतेने भाजपला सत्ता दिली नाही तर बिहारला करोनाची लस मिळणार नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. हा अमानुषपणा आहे. खरंतर, निवडणूक असो किंवा नसो, संपूर्ण देशाला लस मिळेल असं त्यांनी म्हटलं पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राला करोनाच्या लसीसाठी चार वर्षे वाट पाहावी लागेल,’ अशी भीती आव्हाड यांनी वर्तवली आहे.
[…] Bihar Election l ‘हे म्हणजे माणुसकीची खालची पा… […]