मुंबई l गेल्या ४० वर्षांपासून भाजपामध्ये असणारे एकनाथ खडसे Eknath khadse यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज शुक्रवार (23 ऑक्टोबर) अधिकृत प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यास इतर नेते उपस्थित होते.
एकनाथ खडसे Eknath khadse यांच्यासोबत त्यांची मुलगी मुलगी रोहिणी खडसे Rohini khadse यांच्यासह सर्व समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, ना. छगन भुजबळ, ना.अनिल देशमुख,खा. सुप्रिया सुळे,ना.राजेंद्र शिंगणे,ना. दिलीप वळसे पाटील,ना.जितेंद्र आव्हाड,अनिल गोटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ खडसे काय म्हणाले होते…
“कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी अशी मागणी केल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. मीदेखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं.
दगड, धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षाने कमी दिलं असं नाही. पण मीदेखील पक्षासाठी ४० वर्ष काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं.
पुढे ते म्हणाले होते की, “देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली… त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं.
मी जेव्हा खटला दाखल कऱण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं”.
“मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. एकाप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं तोही बनावट यापेक्षा वाईट काय. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं त्यापेक्षा वाईट,” असं खडसेंनी म्हटलं. “भ्रष्टाचाराचा आरोप वैगेरे ठीक आहे, पण विनयभंगाचा आरोप किती वाईट, मी सुटलो त्यातून नाहीतर तीन महिने जेलमध्ये गेलो असतो. बदनामी घेऊन गेलो असतो,” अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.
[…] […]