ठाणे : अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी तक्रार शिवसेनेच्या आयटी सेलने केली आहे. ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात कंगना विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कंगनाला केंद्रीय गृहमंत्रायलायने कंगनाला Y दर्जाची सुरक्षा दिली. केंद्राच्या या निर्णयाविरोधात चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”, असं या तक्रारीत म्हटलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळलं. इतकंच नाही तर कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं. कंगना उद्या बुधवारी मुंबईत दाखल होणार त्यामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.