मुंबईः अर्थमंत्री निर्मला सीतारामन Nirmala sitharaman यांनी आज संसदेत अर्थसंकल्प Union budget 2021 सादर केला. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून राज्याची निराशा झाली. आता आर्थिक थापा बंद करायला हव्यात, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay raut यांनी केली आहे.
‘अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण बजेटचा भार महाराष्ट्रावर अवलंबून आहे. पण, बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीही विशेष तरतूद नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
‘महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहेत. आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहे आणि किती खोटे? हे सहा महिन्यात कळेल,’ असा टोला राऊतांनी लगावला आहे.
Budget 2021: अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा; जाणून घ्या एका क्लिकवर
आज सादर झालेले बजेट देशाचे होते की पक्षाचे होतेय़ पक्षाचं निधीवाटप सुरु आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. शिवाय, पेट्रोल डिझेलवर लावलेल्या कृषी अधिभारावरही राऊतांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. अधिभार लावून त्यांना पेट्रोल- डिझेल हजार रुपये करायचे आहे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पात मोदी सरकारची नजर आगामी विधानसभा निवडणुकांकडेही असल्याचं दिसून आलं. पश्चिम बंगालच्या रस्त्यांसाठी २५ हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलीय.
हेही वाचा: म्यानमारमध्ये जबरदस्ती सत्ता ताब्यात घेणाऱ्या लष्कराला अमेरिकेने दिला ‘हा‘ इशारा
उल्लेखनीय म्हणजे, देशातील रस्त्यांसाठी १ लाख १८ हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्यातील २५ हजार कोटी केवळ पश्चिम बंगालमधील रस्त्यांसाठी वापरण्यात येणार आहेत.
हेही वाचा: कोरोनावर लस शोधून शास्त्रज्ञांनी जीवनदान दिलं, बजेटनं मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं