मुंबई: राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी बारावीची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत होईल याचे संकेत दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा HSC EXAM होणार आहे. तसेच दहावीच्या बोर्डाची SSC EXAM लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधी घेण्यात येईल. तसेच या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. Maharashtra Ssc, Hsc Exam and Result Date 2021
यंदा एचएससी (इ. १२ वी) बोर्डाची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.#hscexam pic.twitter.com/5bMXXwevNd
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 21, 2021
बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते.
हेही वाचा: वैक्सीनेशन का छठा दिन: भारत में साइड इफेक्ट के 600 केस आए सामने