प्रियंका गांधींचे मोदी सरकारला हाथरस प्रकरणी पाच प्रश्न

priyanka-gandhi-asks-few-questions-to-yogi-and-modi-government-on-hathras-case
प्रियंका गांधींचे मोदी सरकारला हाथरस प्रकरणी पाच प्रश्न priyanka-gandhi-asks-few-questions-to-yogi-and-modi-government-on-hathras-case

नवी दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने पाच प्रश्न मोदी सरकारला केले आहेत. ( priyanka-gandhi-asks-few-questions-to-yogi-and-modi-government-on-hathras-case ) हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होते आहे. तसेच भाजपावर जोरदार टीका होत आहे.

प्रियंका गांधींनी उपस्थित केले पाच प्रश्न

सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे

हाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये

आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला?

आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?

आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?

हाथरस प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या वतीने हे प्रश्न मोदी सरकारला आणि उत्तर प्रदेश सरकारला विचारले आहेत. उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीवर हल्लाही झाला तिची जीभ छाटण्यात आली.

पीडित मुलीवर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरला उशिरा या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातून होतो आहे.

दरम्यान हाथरस या ठिकाणी प्रियंका आणि राहुल गांधी हे पीडितेच्या कुटुंबीयांना सुरुवातीला भेटू दिलेलं नाही. तिथे राहुल गांधी यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.

 या सगळ्या प्रकाराचा निषेध देशभरातून झाल्यानंतर तसंच या प्रकरणावरुन खूप टीका झाल्यानंतर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रियंका गांधी यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

उत्तर प्रदेशच्या हाथरस अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटोत एक पोलीस कर्मचारी प्रियांका गांधी यांच्या कपड्यांना पकडून खेचताना कॅमेऱ्यात कैद झालाय. विरोधकांनी योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

शनिवारी हाथरसकडे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना दिल्ली नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हरजवळ पोलिसांनी रोखलं. याच दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांदरम्यान झटापट झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रियांका गांधी स्वत: पुढे आल्या.

त्यावेळचा हा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. हे फोटो काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून शेअर करतानाच सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलंय.

चांदणी चौकच्या माजी आमदार आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केलाय. ‘निशब्द आहे’ असं अलका लांबा यांनी या फोटोसोबत म्हटलंय.

वाचा : सुशांतसिंग प्रकरणात भाजपाचे षडयंत्र उघड सविस्तर वाचा

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही हा फोटो शेअर करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. ‘याहून लज्जास्पद आणि घातक आणखी काही असू शकतं का?’ असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.

काँग्रेससोबतच, या फोटोवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर हल्लाबोल केलाय. ‘योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाहीत का?’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here