मुंबई लोकल दोन आठवड्यानंतर येणार ‘ट्रॅक’वर!

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली माहिती

aaditya-thackeray-attacks-eknath-shinde-over-twitter-poll –news-update-today
aaditya-thackeray-attacks-eknath-shinde-over-twitter-poll –news-update-today

 मुंबई : मुंबई लोकल सेवा कधी सुरु होणार याची उत्सुकता आता संपणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून लोकल सेवा आणि मुंबईतील सर्व ऑफिस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. रेल्वे सेवेबाबत राज्य सरकार केंद्र सरकारशी समन्वय राखून काम करत आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी दिली. (mumbai local trains may start by mid october says aaditya thackeray)

महाराष्ट्रातील (maharashtra) कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (corona recovery rate) ७८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोना संकटावर बऱ्याचअंशी नियंत्रण मिळवले असल्यामुळे राज्याचा कारभार वेगाने सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राजधानीचा कारभार रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून लोकल सेवा आणि मुंबईतील सर्व ऑफिस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

कोरोना संकट सुरू झाल्यापासून लोकलच्या वाहतुकीत प्रचंड बदल झाला आहे. सध्या लोकलमधून फक्त केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी आणि बँक कर्मचारी यांना प्रवास करण्याची परवानगी आहे.

सध्या अशी सुरु आहे लोकलसेवा

पश्चिम रेल्वे (western railway) मार्गावर ५०६ आणि मध्य रेल्वे (central railway) मार्गावर ४२३ लोकल फेऱ्या सुरू आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरती सकाळी ७.३५ची विरार-चर्चगेट आणि संध्याकाळी ६.१०ची चर्चगेट-विरार या दोन लोकल फेऱ्या महिला विशेष म्हणून सुरू आहेत. महिला विशेष व्यतिरिक्त नव्या व्यवस्थेत १२ डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणीचे ३ डबे राखीव असतात. या व्यतिरिक्त ३ प्रथम श्रेणी डब्यांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आसने राखीव असतात.

सध्या अत्यावश्यक सेवेमर्यादीत लोकल असल्यामुळे अद्याप अनेकांना मुंबईतले ऑफिस गाठण्यासाठी दररोज एक किंवा त्यापेक्षा जास्त बसमधून प्रवास करावा लागतो. अनेकांना घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा दररोज किमान ३-४ तास प्रवास करावा लागत आहे. लोकल सुरू होईपर्यंत नागरिकांचे हाल सुरू राहणार आहेत.

मनसेने लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करा नाही तर मुंबई आणि आसपासच्या सर्व शहरांतील पालिकांची बस वाहतूक तसेच राज्य परिवहनच्या एसटी यांच्या फेऱ्या वाढवून नागरिकांची सोय करण्याची मागणी केली होती. लोकल सुरु करावेत या मागणीसाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही सविनय कायदेभंग आदोलन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here